Skip to content

दिवस4: ता ऱ्यांस हुंगण्यासाठी काल्कीसमान प्रवास करणे

  • by

येशूने 3 ऱ्या दिवशी एक शाप दिला, आणि आपल्या राष्ट्राला शाप देऊन हद्दपार केले. येशूने असेही भाकीत केले होते की त्याचा शाप संपुष्टात येईल आणि याद्वारे युगाच्या समाप्तीच्या घटना सुरू होतील. शिष्यांनी याबद्दल विचारले आणि येशूने त्याच्या परत येण्याचेचे वर्णन काल्की (कालकीन) सारखे केले.

त्याने अशी सुरुवात केली.

शू मंदिरातून बाहेर निघून चालत निघाला होता तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे आले. कारण त्यांना त्याला मंदिराच्या इमारती दाखवायच्या होत्या.
2 प्रतिसादादाखल, तो त्यांना म्हणाला, तुम्ही या सर्व गोष्टी पाहता. खरे ना? आता, मी तुम्हांला खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक दगड खाली टाकला जाईल.”
3 येशू जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात बोलावे म्हणून आले, ते म्हणाले, आम्हांला सांगा की या गोष्टी कधी होतील? तुम्ही परत येण्याचा आणि जगाचा शेवट होण्याचा काळ जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या घटनांवरून ओळखावे?”

मत्तय 24:1-3

त्याने त्याच्या शापाची माहिती देऊन सुरुवात केली. मग संध्याकाळी तो मंदिर सोडून यरुशलेमाच्या बाहेर जैतुनाच्या डोंगरावर जाण्यासाठी बाहेर पडला (1) यहूदी दिवसाची सुरूवात सूर्यास्तापासून होत असे, म्हणून त्याने आपल्या येण्याचे वर्णन केले तेव्हापासून आता आठवड्याचा चैथा दिवस होता.

पौराणिक कथांमध्ये काल्की

गरुड पुराणात काल्कीचे वर्णन विष्णूच्या दशावताराचा (दहा प्राथमिक अवतार/देहधारण) शेवटचा अवतार आहे. काल्की सध्याचे युग, म्हणजे कलियुगाच्या शेवटी येईल. पुराणात असे म्हटले आहे की, काल्कीच्या प्रगट होण्यापूर्वी जगाचे अधोपतन होईल आणि धर्म नष्ट होईल. लोक अनैसर्गिक लैंगिक संबंधांमध्ये व्यस्त राहतील, त्यांस नग्नता आणि अनैतिक आचरण यांची आवड असेल आणि विविध नैसर्गिक आपत्ती आणि पीडा जगावर येतील. या क्षणी, काल्की अग्नीमय तलवार चालवीत घोड्यावर स्वार होऊन प्रगट होईल. काल्की पृथ्वीच्या दुष्ट रहिवाशांचा नाश करेल आणि एका नव्या युगास सुरूवात करील, याद्वारे तो जगास परत सत्ययुगाकडे आणील.

तथापि, विकिपीडियामध्ये म्हटले आहे की वेदांमध्ये काल्की/काल्किनचा उल्लेख नाही. परशुरामाचा, 6वा दशावतार अवतार म्हणून तो केवळ महाभारतात दिसतो. महाभारताच्या या आवृत्तीत, काल्की केवळ दुष्ट शासकांचा नाश करतो परंतु सत्ययुगात नूतनीकरण आणीत नाही. विद्वान 7-9 व्या शतकात कधीतरी काल्कीच्या आदिम रूपाचा विकास झाल्याचे सुचवितात.

काल्कीची इच्छा

काल्की आणि इतर परंपरांमधील तत्सम व्यक्तींचा विकास (बौद्ध धर्मातील मैत्रेय्या, इस्लाममधील महदी, शीख महदी मीर) आमच्या मनात सहज ही भावना उत्पन्न करतो की जगामध्ये काहीतरी चुकीचे आहे. कोणीतरी यावे आणि ते ठीक करावे अशी आमची इच्छा आहे. आमची इच्छा आहे की त्याने दुष्ट जुलूम करणाऱ्यांना काढून टाकावे, भ्रष्टाचार दूर करावा आणि धर्मास उन्नत करावे. परंतु आपण हे विसरतो की त्याने फक्त ‘तेथील’ वाईट गोष्टीच काढून टाकल्या पाहिजेत असे नाही तर आमच्यातील भ्रष्टाचारही दूर करून आम्हास शुद्ध केले पाहिजे. एखाद्याने यावे आणि वाईटाचा पराभव करावा अशी उत्कट इच्छा इतर पवित्र ग्रंथांद्वारे व्यक्त करण्यापूर्वी, येशूने शिकवले की तो हे दोन भागातील कार्य कसे सुरू करील. तो त्याच्या पहिल्या आगमनाच्या वेळी आमचा अंतर्गत भ्रष्टाचार स्वच्छ करतो, त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी सरकारी आणि सामाजिक अधर्माशी व्यवहार करतो. येशूने आपल्या आगमनाची या आठवड्याच्या 4 थ्या दिवशी अपेक्षा केली व त्याच्या परत येण्याच्या चिन्हांचे वर्णन केले.

दिवस 4 – त्याच्या परतीची चिन्हे

4 येशूने त्यांना उत्तर दिले, सांभाळा! कोणीही तुम्हांला फसवू नये
5 मी हे म्हणतो कारण असे पुष्कळ आहेत की जे माझ्या नावाने येतील आणि ते म्हणतील, मी ख्रिस्त आहे,’ आणि ते पुष्कळ लोकांना फसवितील.
6 तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही.
7 होय, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल. अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील.
8 पण या सर्व गोष्टी म्हणजे प्रसूतीच्या कळांची सुरूवात अशा आहेत.
9 लोक तुमच्याशी वाईट वागतील. तुमचा छळ व्हावा आणि तुम्हांला जिवे मारावे यासाठी लोक तुम्हांला राज्यकर्त्याच्या हाती देतील. सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून या गोष्टी तुमच्यावर ओढवतील.
10 अशा वेळी बरेच विश्वासणारे आपला विश्वास गमावतील. ते एकमेकाविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील.
11 अनेक खोटे संदेष्टे येतील, ते लोकांना चुकीचे शिक्षण देतील व त्यावर विश्वास ठेवायला लावतील.
12 सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे अधिकाधिक विश्र्वासणाऱ्यांची प्रीति कमी कमी होत जाईल.
13 सर्व जगभर देवाची सुवार्ता गाजविली जाईल व हे सर्व राष्ट्रातील लोकांना साक्ष असे होईल. आणि मग शेवट होईल.
14 दानीएल संदेष्ट्यांने एका अमंगळ गोष्टीविषयी सांगितले की, जिच्यामुळे नाश ओढवेल. अशी अमंगळ गोष्ट ही पवित्र जागी- मंदिरामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.”
15 तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.
16 त्यावेळी यहूदातील लोकांनी डोंगरावर पळून जावे.
17 जो कोणी छपरावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी उतरु नये.
18 जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी परत जाऊ नये.
19 त्याकाळी गर्भवती असलेल्या अगर तान्ही बालके असलेल्या स्रियांना फार कठीण जाईल.
20 जेव्हा या गोष्टी होतील आणि तुम्हांला पळून जावे लागेल तेव्हा थंडीचे दिवस नसावेत अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा.
21 कारण त्याकाळी फार पीडा येतील. जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी पीडा त्या काळी भोगावी लागेल.
22 आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीच वाचले नसते. परंतु त्याच्या निवडलेल्यांमुळे तो ते दिवस थोडे करील.
23 त्या वेळी जर एखाद्याने तुम्हांला म्हटले, पहा! ख्रिस्त येथे आहे, किंवा तो तेथे आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
25 या गोष्टी होण्या अगोदरच मी तुम्हांला सावध केले आहे.
26 “एखादा मनुष्य तुम्हांला सांगेल, पाहा, मशीहा ओसाड रानात आहे. तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, ख्रिस्त, आतल्या खोलीत लपला आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
27 मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमकडे चमकताना सर्वाना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणेदेखील असेल.
28 जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही असतील.
29 “छळानंतर लगेच, असे घडेल:‘सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही. आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील आकाशातील सर्व शक्ती डळमळतील. आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.
30 “त्यावेळेला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व लोक शोक करतील. मनुष्याच्या पुत्राला सर्व जण मेघावर बसून येताना पाहतील. तो महासामर्थ्य आणि वैभव यांच्यासह येईल.
31 मनुष्याचा पुत्र तुतारीचा मोठा नाद करून आपले दूत पृथ्तीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.

मत्तय 24:4-31

4थ्या दिवशी येशूने मंदिराच्या येणाऱ्या नाशापलीकडे पाहिले. त्याने शिकवले की वाढती दुष्टाई, भूकंप, दुष्काळ, युद्धे आणि छळ हे परत येण्यापूर्वी जगाचे वैशिष्ट्य ठरतील. तरीही, त्याने भविष्यवाणी केली की सुवार्तेची घोषणा अद्याप संपूर्ण जगात केली जाईल (अ 14). जग ख्रिस्ताविषयी जान असतांना खोट्या शिक्षकांची संख्या देखील वाढत जाईल आणि त्याच्याबद्दल आणि त्याच्या परत येण्याबद्दल खोटे दावे केले जातील. निर्विवाद वैश्विक उपद्व्याप म्हणजे युद्धे, अनागोंदी आणि दुर्दशा यांच्या दरम्यान त्याच्या परत येण्याचे खरे लक्षण दिसून येईल. तो तारे, सूर्य व चंद्र यांचा प्रकाश विझवून टाकील.

त्याच्या आगमनाचे वर्णन करण्यात आले आहे

योहानाने नंतर त्याच्या परत येण्याचे वर्णन केले आणि काल्कीसारखे त्याचे चित्रण केले:

11 नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला; आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसलेल्याचे‘नाव विश्वासू आणि खरा’ असे होते; कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो.
12 त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुगुट आहेत. त्याचे नाव त्याच्यावर लिहिलेआहे. ते नाव काय आहे हे त्याच्याशिवाय इतर कोणालाही माहीत नाही.
13 त्याने आपल्या अंगात रक्तामध्ये भिजविलेलाझगा घातला होता. त्या स्वाराचे नाव “देवाचा शब्द” असे आहे.
14 स्वच्छ आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले स्वर्गातील सैन्यपांढऱ्या घोड्यांवर बसून त्याच्या मागे येत होते.
15 त्याच्या तोंडातून एक धारदार तरवार येते जिच्याने तो राष्ट्रांना नमवील,आणि लोखंडी दंडाने तो त्यांच्यावर सता गाजवील. सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाची द्राक्षे तो द्राक्षकुंडामध्ये तुडवील.
16 त्याच्या झग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे:
17 नंतर सूर्यात उभा राहिलेला एक देवदूत मी पाहिला. तो मोठ्याने ओरडून आकाशामध्ये उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना म्हणतहोता, “या! देवाच्या महान मेजवानीसाठी जमा व्हा!
18 म्हणजे राजे, सरदार आणि प्रसिद्ध माणासांचे मांस तुम्हांलाखावयाला मिळेल. घोड्यांचे आणि त्यांच्यावर स्वार झालेल्यांचे, तसेच स्वतंत्र व गुलाम, लहान व थोर अशा सर्व लोकांचेमांस तुम्हांला खावयाला मिळेल.”
19 मग मी ते श्र्वापद आणि पृथ्वीवरील राजे आपापले सैन्य घेऊन जमा झालेले पाहिले. घोडेस्वारबरोबर व त्याच्यासैन्याबरोबर लढाई करण्यासाठी ते जमा झाले होते.
20 त्या श्र्वापदाला पकडण्यात आले. त्या प्राण्याच्या समक्ष ज्या खोट्यासंदेष्ट्याने चमत्कार केले होते, त्याला देखील प्राण्याबरोबर पकडण्यात आले. प्राण्याचा शिक्का अंगावर असलेल्या आणित्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्या लोकांना त्या खोट्या संदेष्ट्याने चमत्कार दाखवून फसविले, त्या दोघांना (प्राणी आणिखोटा संदेष्टा यांना) धगधगत्या गंधकाच्या अग्नीने भरलेल्या तळ्यात जिवंत असे टाकण्यात आले.
21 शिल्लक राहीलेलेसैन्य, घोडेस्वाराच्या तोंडामधून निघालेल्या तरवारीने ठार मारण्यात आले. आणि साऱ्या पक्ष्यांनी त्या सैनिकांचे मांस पोटभरखाल्ले.

प्रकटीकरण 19:11-21

चिन्हांचे मूल्यांकन करणे

आपण पाहू शकतो की युद्ध, संकट आणि भूकंप वाढत आहेत – अशाप्रकारे त्याच्या परत येण्याची वेळ जवळ येत आहे. परंतु स्वर्गात अजूनही काही हालचाल झालेली नाही म्हणूनच त्याचा परत येणे अद्याप नाही.

आपण किती जवळ आहोत?

उत्तर देण्यासाठी येशू पुढे म्हणाला

अंजीर वृक्ष आमच्या डोळ्यासमोर हिरवागार होतो

इस्राएलचे प्रतीक म्हटलेले अंजिराचे झाड आठवते का ज्याला त्याने 3 ऱ्या दिवशी शाप दिला होता? इस्राएलच्या नाशास सन 70 मध्ये सुरुवात झाली जेव्हा रोमी लोकांनी मंदिर नष्ट केले आणि 1900 वर्षे ते कोरडे पडले म्हणजे उद्धवस्त राहिले. येशूने म्हटले की अंजीर वृक्षास पालवी फुटेल त्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हास कळून येईल की त्याचे आगमन ‘जवळ’ आले आहे. गेल्या 70 वर्षात आम्ही या ‘अंजीर वृक्षाचे’ हिरवेगार होणे व पुन्हा पाने फुटू लागलेले पाहिले आहे. होय, यामुळे आपल्या काळातील युद्धे, त्रास आणि संकटे यामध्ये आणखी भर पडली आहे, परंतु त्याने याविषयी इशारा दिल्याने याचे आपल्याला आश्चर्य वाटता कामा नये.

म्हणूनच आपल्या काळात आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि जागृत असले पाहिजे कारण त्याच्या आगमनाविषयी त्याने निष्काळजीपणा व बेपरवाईविरुद्ध सावध केले आहे.

36 “पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटके विषयी कोणालाही माहीत नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, किंवा खुद्द पुत्रालाही नाही. फक्त पिताच हे जाणतो.
37 नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल.
38 महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते. लोक लग्न करीत होते. लग्न करून देत होते. नोहा जहाजात जाईपर्यत लोक या गोष्टी करीत होते.
39 त्यांना माहीत नव्हते की काही तरी घडणार आहे. परंतु नंतर पूर आला आणि सर्व लोक मरून गेले. मनुष्याचा पुत्र आल्यावर असेच होईल.
40 दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एक जण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील.
41 दोन स्त्रिया जात्यावर धान्य दळत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील.
42 “म्हणून तुम्ही तयार असा, कारण तुम्हांला माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येत आहे,
43 हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते.
44 या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हांला अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.
45 “शहाणा आणि विश्वासू सेवक कोण बरे? दुसऱ्या सेवकांना वेळेवर जेवण देण्याचे काम मालक एका सेवकावर सोपवितो. हे काम करण्यासाठी मालक कोणाला विश्वासाने सांगेल?
46 मालक आल्यावर आपले दिलेले काम करीत असलेला सेवक खरोखर धन्य!
47 मी तुम्हांला सांगतो: मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या सेवकाची नेमणूक करील.
48 “पण जर सेवक वाईट निघाला आणि आपला मालक लवकर घरी परत येणार नाही असे म्हणाला तर काय होईल?
49 तो सेवक इतर सेवकांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल.
50 आणि तो सेवक तयारीत नसेल अशा वेळी मालक येईल.
51 मग मालक त्या सेवकाचे तुकडे करील. त्या सेवकाला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील. आणि त्या ठिकाणी रडणे व दात खाणे

चालेल.मत्तय 24:36-51

येशू शिकवीत राहिला. दुवा येथे आहे.

दिवस 4 सारांश

दुःख सप्ताहाच्या बुधवारी, 4थ्या दिवशी, येशूने आपल्या परत येण्याची चिन्हे वर्णन केली – आकाशातील सर्व बळे अन्धकारमय होतील असे

दिवस 4: हिब्रू वेद नियमांच्या तुलनेत दुःख सप्ताहाच्या घटना

त्याने आम्हा सर्वांना त्याच्या परत येण्यासाठी जागृत राहण्याचा इशारा दिला आहे. आपण आता अंजीराच्या झाडाला हिरवळ दिसू लागल्याचे आपण पाहू शकतो, म्हणून आपणलक्ष दिले पाहिजे.

पुढे 5 व्या दिवशी त्याचा शत्रू त्याच्याविरुध्द कसा चालून आला हे शुभवर्तमानात नोंदवले आहे.

(1) त्या आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे वर्णन करताना लूक स्पष्ट करतो  :  

लूक 21:37

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *