Skip to content

मोक्ष साध्य करण्याचा अब्राहामाचा सोपा मार्ग

  • by

महाभारतात अपत्यहीन राजा पंडू याच्या संघर्षाचे वर्णन करण्यात आले आहे ज्यास वारस नव्हता. ऋषी किन्दमा आणि त्याच्या पत्नीने विवेकशीलपणे परस्पर प्रेमक्रीडा करण्यासाठी हरिणांचे रूप धारण केले. दुर्देवाने, त्यावेळी राजा पंडू शिकार करीत होता आणि त्याने नकळत त्यांस बाण मारला. संतप्त होऊन, किन्दमाने राजा पंडूला शाप दिला की त्याच्या पत्नींसोबत सहवास करीत असतांना त्याला मरण येईल. अशाप्रकारे राजा पंडू मुलांस जन्म देऊ शकला नाही आणि त्याच्या सिंहासनास वारस देऊ शकला नाही.

राजा पंडूचा जन्म देखील मागील पिढीची अशीच समस्या सोडविण्यासाठी केलेले निकराचे कृत्य होते. मागील राजा, विचित्रवीर्य याचा मृत्यू अपत्यहीन झाल्यामुळे वारसांची गरज होती. विचित्रवीर्याची आई सत्यवती हिला विचित्रवीर्याचा पिता, शंतनुशी लग्न होण्यापूर्वी एक मुलगा झाला होता. या मुलास, व्यास्यास, विचित्रवीर्यच्या विधवा अंबिका आणि अंबालिका यांस गरोदर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. व्यास आणि अंबालिका यांच्यातील सहवासातून पंडूचा जन्म झाला होता. राजा पंडू हा व्यासाचा जैविक मुलगा होता परंतु तो नियोगाद्वारे पूर्वीच्या राजा विचित्रवीर्यचा वारस होता, या प्रथेद्वारे पतीच्या मरणानंतर इतर पुरुष मुलाचा पिता बनू शकत असे. मोठी गरज असल्यामुळे असे करण्याची गरज भासली होती.

आता राजा पंडूला देखील किन्दमाने त्याला दिलेल्या शापामुळे समान समस्येला तोंड द्यावे लागत होते. काय करावे? पुन्हा एकदा, निकडीचे कार्य करण्याची गरज होती. पंडूंच्या पत्नींपैकी एक, राणी कुंती (अथवा पृथा), हिला एक मंत्र माहीत होता (तिच्या बालपणी ब्राम्हण दुर्वासाने प्रकट केलेला) जो तिला देवाद्वारे गरोदर करणार होता. म्हणून राणी कुंती हिने तीन मोठ्या पांडव बंधूंच्या गर्भधारणासाठी हा गुप्त मंत्र वापरला: युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. राणी कुंतीची सह-पत्नी राणी, माद्री हिने कुंतीकडून हा मंत्र मिळविला आणि तिने लहान पांडवबंधंसू नकुल आणि सहदेव यांना त्याचप्रकारे जन्म दिला.

अपत्यहीन राहिल्यास जोडप्यांना खूप दुःख होते. जेव्हा एखाद्या राष्ट्राला वारस नसतो तेव्हा हे सहन करणे आणखीच कठीण होते. प्रतिनिधी म्हणून जोडीदार शोधणे असो वा देवास कृत्य करावयास प्रेरित करण्यासाठी गुप्त मंत्र बोलणे, अशा परिस्थितीत निष्क्रीय राहणे हा क्वचितच एक पर्याय राहतो.

ऋषी अब्राहामाला 4000 वर्षांपूर्वी अशाच परिस्थितीला तोंड द्यावे लागले होते. ज्याप्रकारे त्याने ही समस्या सोडविली त्याचे वर्णन हिब्रू वेदपुस्तकात (बायबल) एक आदर्श असे केले म्हणून त्यापासून धडा प्राप्त करणे शहाणपणाचे ठरेल.

अब्राहामाची तक्रार

उत्पत्ति 12 मध्ये नोंदवलेले अभिवचन बोलल्यापासून अब्राहामाच्या जीवनात कित्येक वर्षे गेली आहेत. अब्राहाम कराराच्या देशाकडे वाटचाल करीत होता जेथे या अभिवचनाचे पालन केल्यामुळे आज इस्राएल लोक आहेत. त्यानंतर त्याच्या जीवनात इतर घटना घडल्या एकास सोडून ज्याची त्याने अपेक्षा केली होती  – ज्याच्याद्वारे हे अभिवचन पूर्ण होईल त्या मुलाचा जन्म. म्हणून आपण अब्राहामाच्या तक्रारीसह वृत्तांत सुरू ठेवतो :

सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांन्तात परमेश्वराचे वचन आले. देव म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको; मी तुझे रक्षण करीन आणि तुला आनंद होईल असे मी तुला मोठे प्रतिफळ देईन.”
2 परंतु अब्राम म्हणाला, “परमेश्वर देवा, असे काहीही प्रतिफळ नाही की जेणे कडून मला आनंद होईल, कारण मला मुलगा नाही; म्हणून माझ्या मरणानंतर माझे सर्वकाही दिमिष्कातील माझा गुलाम, अलिएजर यालाच मिळेल.”
3 अब्राम पुढे म्हणाला, “तू मला मुलगा दिला नाहीस म्हणून माझ्या घरात जन्मलेला माझा गुलामच माझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”

उत्पत्ति 15:1-3

देवाचे अभिवचन

अब्राहाम त्याला अभिवचन देण्यात आलेल्या ‘मोठ्या राष्ट्राची’ सुरूवात होण्याच्या प्रतीक्षेत त्या देशात तंबू उभारून राहत होता. पण पुत्राचा जन्म झाला नव्हता आणि या वेळेपर्यंत तो 85 वर्षांचा झाला, त्याच्या आरोपाचा भर याच गोष्टीवर होता :

  4 परमेश्वर अब्रामाशी बोलला, तो म्हणाला, “तुझे सर्वकाही त्या तुझ्या गुलामाला मिळणार नाही; तर तुला मुलगा होईलआणि तोच तुझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”
5 मग देवाने अब्रामाला रात्रीचे आकाश दाखविण्यासाठी बाहेर नेले. देव म्हणाला, “ह्या आकाशातील ताऱ्यांकडे पाहा, तुला मोजता येणार नाहीत इतके ते आहेत; येथून पुढच्या काळात तुझी संततीही त्या ताऱ्यांइतकी अगणित होईल.”

उत्पत्ति 15:4-5

त्यांच्या परस्पर संभाषणात देवाने पुन्हा ही घोषणा करीत  आपल्या अभिवचनाचे नवीनीकरण केले की अब्राहामास पुत्र होईल जो असे राष्ट्र बनेल ज्यांची संख्या आकाशातील तार्यांप्रमाणे अगणीत असेल – निश्चितच असंख्य, परंतु मोजावयास कठीण.

अब्राहामाची प्रतिक्रिया : स्थायी प्रभाव असलेल्या पूजेसमान

जवाबदारी पुन्हा अब्राहामावर येऊन पडली. तो ह्या नवीन अभिवचनास कसा प्रतिसाद देणार होता? यानंतर जे काही होते त्यांस बायबलमध्ये अत्यंत महत्वपूर्ण वाक्ये मानली आहेत.  त्याद्वारे सार्वकालिक सत्य समजण्यासाठी पाया घातला जातो. त्यात म्हटले आहे :

6 अब्रामाने देवावर विश्वास ठेवला देवाने त्याची प्रामाणिकांता गणना केली प्रमाणिक जीवन जगण्यास योग्य असा त्याचा विश्वस होता.

उत्पत्ति 15:6

जर आपण वाचण्यासाठी, सर्वनामांऐवजी नावे लिहिली तर हे वाक्य समजून घेणे अधिक सोपे जाईल :

अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला.

उत्पत्ति 15:6

हे अतिशय लहान आणि विसंगत वाक्य आहे. हे कोणत्याही बातमीचे शीर्षक नसते आणि म्हणून कदाचित आपण ते पाहिले नसेल. पण ते खरोखरच महत्वपूर्ण आहे. का? कारण या छोट्या वाक्यात अब्राहामाला नीतिमत्त्व लाभते. हे एखाद्या पूजेचे पूण्य मिळवण्यासारखे आहे जे कधीच कमी होणार नाही किंवा हरवले जाणार नाही. नीतिमत्व हा एकमेव – आणि केवळ एकच – गुण आहे ज्याची आम्हाला देवासमोर योग्य स्थान प्राप्त करण्यासाठी गरज आहे.

आमच्या समस्येचे पुनरावलोकन करणे : भ्रष्टाचार

देवाच्या दृष्टिकोनातून, जरी आपण परमेश्वराच्या प्रतिरूपात घडविले गेलो असलो तरी असे झाले की ते प्रतिरूप भ्रष्ट झाले. आता निकाल असा आहे

2 परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता. त्याला शहाणे लोक शोधायचे होते शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.
3 परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे. सर्वलोक वाईट झाले आहेत. एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता.

स्तोत्र 14:२-3

स्वभावतः आम्हाला हा भ्रष्टाचार जाणवतो. म्हणूनच उत्सवात, कुंभमेळासारख्या उत्सवात, लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात कारण आपल्याला आपले पाप आणि आपली शुद्धीकरणाची गरज जाणवते. प्रार्थस्नान (किंवा प्रतासन) मंत्र देखील आमचे स्वतःबद्दल असलेले हे मत व्यक्त करतो :

मी पापी आहे. मी पापाचा परिणाम आहे. मी पापात जन्मलो आहे. माझा आत्मा पापाधीन आहे. मी सर्वात घोर पातकी आहे. हे सुंदर डोळे असलेल्या प्रभू, हे बलिदानाच्या प्रभू, मला वाचव.

आपल्या भ्रष्टाचाराचा परिणाम असा आहे की आपण स्वतःला नीतिमान देवापासून वेगळे केलेले पाहतो कारण आमच्या ठायी स्वतःचे कोणतेही नीतिमत्त्व नाही. आपल्या भ्रष्टाचाराने आपली नकारात्मक कर्मे वाढतांना पाहिली आहेत – त्यामुळे निरर्थकता आणि मृत्यूची कापणी करतो. जर आपल्‍याला शंका असेल तर काही बातम्यांचे मथळे स्कॅन करा आणि गेल्या 24 तासांत लोक काय करीत आहेत ते पहा. आपण जीवनाच्या कर्त्यापासून विभक्त झालो आहोत आणि म्हणूनच वेद पुस्तकमच्या (बायबल) ऋषी यशयाचे शब्द खरे ठरतात

6 काही लोकांजवळ भरपूर सोने-चांदी असते. सोने त्यांच्या वटव्यातून गळत असते. चांदी ते तराजूने तोलतात. हे लोक कारागिराला पैसे देऊन लाकडापासून खोटा देव तयार करून घेतात. नंतर ते त्या देवाची पूजा करतात. त्याच्यापुढे नतमस्तक होतात.

यशया 64:6

अब्राहम आणि नीतिमत्व

परंतु येथे अब्राहाम आणि परमेश्वर यांच्यामध्ये, आपण इतक्या हळूच ही घोषणा मांडलेली पाहतो, की अब्राहामाने नीतिमत्त्व प्राप्त केले होते – जसे देव स्वीकार करतो. तर नीतिमत्त्व मिळवण्यासाठी अब्राहामाने काय केले? पुन्हा एकदा, इतका विवेकी की आपण हा मुद्दा गमावण्याच्या धोक्यात आहोत, ते अब्राहामाविषयी असे म्हणते त्याने विश्वासकेला. बस एवढेच?! आपल्याकडे पाप आणि भ्रष्टाचाराची ही भयानक समस्या आहे आणि म्हणूनच मागील काळात आपली स्वाभाविक प्रवृत्ती परिष्कृत आणि अवघड धर्म, प्रयत्न, पूजा, नीतिशास्त्र, तपस्या, शिकवण इत्यादींचा शोध घेण्याकडे राहिली आहे – नीतिमत्त्व मिळविण्यासाठी आहे. परंतु या मनुष्याने, अब्राहामाने, केवळ “विश्वासाने” हे बहुमूल्य नीतिमत्व प्राप्त केेले. हे इतके सोपे होते की आम्ही ते जवळजवळ गमावून बसू शकतो.

अब्राहामाने हे नीतिमत्त्व ‘कमाविले’ नाही; ते त्याच्या लेखी ‘जोडण्यात’ आले. मग काय फरक आहे? बरे, जर आपण एखादी गोष्ट ‘कमविली’ असेल तर आपण त्यासाठी काम केले – आपण त्यास पात्र आहात. आपण करीत असलेल्या कामाचे वेतन मिळविण्यासारखे हे आहे. पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्या लेखी जोडण्यात येते, तेव्हा ती आपणास दिली जाते. निशुल्कपणे दिलेल्या कोणत्याही भेटीप्रमाणे ती कमविली जात नाही किंवा त्यास आपण  पात्र ठरत नाही, परंतु फक्त स्वीकार केली जाते.

अब्राहामाच्या या वृत्तांतावरून नीतिमत्वाबद्दल असलेली आमची सामान्य समज पार बदलून जाते एक तर या विचारावरून जी देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाने, की नीतिमत्व पुरेसे सत्कृत्य करण्याद्वारे किंवा धार्मिक कार्य करण्याद्वारे प्राप्त होते. अब्राहामाने हा मार्ग घेतला नाही. त्याने फक्त त्याला दिलेल्या वचनावर विश्वास ठेवण्याची निवड केली, आणि नंतर त्याच्या लेखी नीतिमत्व जोडण्यात आले, अथवा देण्यात आले.

बायबलमधील बाकीचा भाग ही भेट आपल्यासाठी चिन्ह मानतो. परमेश्वराच्या   अभिवचनावर अब्राहामाचे विश्वास ठेवणे आणि परिणामी त्याच्या लेखी नीतिमत्व जोडले जाणे, आम्ही अनुसरण करावयाचे उदाहरण आहे. संपूर्ण शुभवर्तमान त्या अभिवचनांवर आधारित आहे जो परमेश्वर देव आपणापैकी प्रत्येकास देतो. पण मग नीतिमत्वासाठी कोण किंमत देतो अथवा ते कमावतो? आपण त्याविषयी पुढे पाहू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *