Skip to content

स्वामी योहान : प्रायश्चित आणि आत्माभिषेक शिकवत आहेत

  • by

आपण कृष्णाच्या जन्माद्वारे येशूच्या (येशू सत्संग) जन्माची तपासणी केली. पौराणिक कथांनुसार कृष्णाला मोठा भाऊ बळराम (बलराम) होता. नंदा हे कृष्णाचे पालक -वडील होते आणि त्यांनी बलरामालासुद्धा कृष्णाचा मोठा भाऊ म्हणून पालन-पोषण केले होते. या महाकाव्यात कृष्णा आणि बलराम यांनी भावांच्या बालपणाच्या अनेक कथा सांगितल्या आहेत आणि त्यांनी युद्धात एकत्र मिळून अनेक असुरांना पराभूत केले होते. कृष्णा आणि बलराम यांनी आपले समान लक्ष्य साध्य करण्यासाठी भागीदारी केली – वाईटाचा पराभव करणे.

येशू आणि योहान, जसे कृष्ण आणि बलराम

कृष्णाप्रमाणेच येशूचा जवळचा नातेवाईक होता, योहान, ज्याच्याबरोबर तो आपल्या कार्याचा वाटेकरी होता.येशू आणि योहान यांचे त्यांच्या आईकडून नाते होते आणि योहानाचा जन्म येशूच्या फक्त 3 महिन्यांपूर्वी झाला होता. शुभवर्तमानात येशूच्या शिकवणीची व आरोग्यदानाची सेवेची नोंद प्रथम योहानाला प्रकाशात आणून करण्यात आली आहेण् जर आपण प्रथम योहानाची शिकवण ऐकली नाही तर आपल्या येशूच्या कार्य समजणार नाही. सुवार्तेचे प्रारंभिक बिंदू म्हणून योहानाने पश्चात्ताप (प्रायश्चित) आणि शुद्धीकरण (आत्माभिषेक) शिकवण्याचा प्रयत्न केला.

बापतिस्मा करणारा योहान : आम्हास तयार करण्यासाठी येणाऱ्या स्वामीविषयी भाकित

शुभवर्तमानात त्याला बरेचदा ‘बापतिस्मा करणारा योहान’ म्हटले जाते कारण त्याने पश्चात्तापाचे (प्रायश्चित) चिन्ह म्हणून शुद्धीवर जोर दिला, योहानाच्या येण्यापूर्वी शेकडो वर्षांआधी प्राचीन हिब्रू वेदांमध्ये त्याच्याबद्दल भविष्यवाणी केली गेली होती.

3 ऐका! कोणीतरी ओरडत आहे, “परमेश्वरासाठी वाळवंटातून मार्ग काढा. आमच्या देवासाठी वाळवंटात सपाट रस्ता तयार करा.
4 प्रत्येक दरी भरून काढा. प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट करा. वेडेवाकडे रस्ते सरळ करा. खडकाळ जमीन गुळगुळीत करा.
5 मग देवाची प्रभा फाकेल आणि सर्व लोक एकत्रितपणे परमेश्वराचे तेज पाहतील. हो! स्वत: परमेश्वराने हे सर्व सांगितले आहे.”

यशया 40:3-5

यशयाने असे भाकीत केले होते की कोणीतरी परमेश्वरासाठी ‘अरण्यात’ ‘मार्ग तयार करण्यासाठी’ येईल. तो अडथळे दूर करील जेणेकरून ‘परमेश्वराचा गौरव प्रकट व्हावा’

https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2017/10/isaiah-sign-of-the-branch-timeline--1024x576.jpg

ऐतिहासिक समयेरेखेत यशया आणि इतर हिब्रू ऋषी (संदेष्टे). येशूच्या आधी मलाखी शेवटचा होता

मलाखीने यशयाच्या 3०० वर्षांनंतर हिब्रू वेदाचे (जुना करार) शेवटचे पुस्तक लिहिले. यशयाने या येणाऱ्या तयारी करणाऱ्याबद्दल जे काही सांगितले होते त्यावर मलाखीने सविस्तरपणे सांगितले. त्याने भविष्यवाणी केली :

र्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी माझा दूत पाठवीत आहे. तो माझ्यासाठी मार्ग तयार करील. अनपेक्षितपणे तुम्ही ज्याचा शोध करत आहात तो प्रभु त्याच्या मंदिरात येईल तुम्हांला हव्या असलेल्या नव्या कराराचा तो दूत आहे तो खरोखरीच येत आहे.”

मलाखी 3:1

मीखाने भविष्यवाणी केली की तयारी करणाऱ्या ‘दूताच्याआगमनानंतर लगेच, देव स्वतः त्याच्या मंदिरात प्रकट होईलहा देवाचा अवतार, येशूचा उल्लेख होता, जो योहानानंतर लगेच येणार होता.

योहान स्वामी

शुभवर्तमानात योहानाविषयी नोंद करण्यात आली आहे:

80 अशा रीतीने तिचा मुलगा मोठा होत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांना प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.

लूक 1:80

तो अरण्यात राहत असतांना

4 योहानाचे कपडे उंटाच्या केसांपासून बनविलेले होते. कातड्याचा कमरपट्टा त्याच्या कमरे भोवती होता. अन्न म्हणून योहान टोळ आणि रानमध खात

असे.मत्तय 3:4

बलरामास मोठे शारीरिक बळ होते. योहानाच्या मोठ्या मानसिक आणि आत्मिक सामर्थ््याने लहानपणापासूनच त्याला वनप्रस्थ (वनवासी) आश्रमाकडे नेले. त्याच्या प्रखर स्वभावाने त्याला वानप्रस्थ म्हणून कपडे घालण्यास व अन्न प्राशन करण्यास प्रवृत्त केले, हे जरी निवृत्तीसाठी नसले तरीही त्याच्या कार्यासाठी तयारी करण्यासाठी होते.  त्याच्या अरण्यातील जीवनामुळे त्याला स्वतःला जाणून घेण्यात, मोहांचा प्रतिकार कसा करावा हे समजून घेण्यात मदत केली. आपण अवतार नाही, किंवा मंदिरातील पुजारीही नाही हे त्याने ठामपणे स्पष्ट केले. त्याच्या आत्मबुद्धीमुळेच सर्वांनी त्याला एक महान शिक्षक म्हणून स्वीकार केले. स्वामी (स्वामी) हा शब्द संस्कृत भाषेतून येतो ज्याचा अर्थ आहे ‘जो स्वतःला जाणतो किंवा ज्याने स्वतःवर प्रभुत्व केले आहे’, त्यामुळे योहानाला स्वामी मानणे योग्य आहे. 

स्वामी योहानइतिहासात दृढपणे मांडलेला

शुभवर्तमान सांगते

बिर्य कैसराच्या कारकीर्दीच्या पंधराव्या वर्षी, जेव्हा पंतय पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता, आणि हेरोद गालीलचा अधिकारी असताना, आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या देशांचा अधिकारी होता व लूसनिय हा अबिलेनेचा अधिकारी होता.
2 हनन्या व केफा हे मुख्य याजक होते, तेव्हा वाळवंटात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे

आले.लूक 3:1-2

येथून योहानाचे कार्य सुरू होते आणि हे त्याला अनेक नामांकित ऐतिहासिक लोकांच्या बरोबरीने आणून ठेवते. तत्कालीन राज्यकर्त्यांचा विस्तृत संदर्भ पहा. याद्वारे आम्हाला शुभवर्तमानातील वर्णनाच्या अचूकतेचे ऐतिहासिकदृष्ट्या परीक्षण करण्यास संधी मिळते.  असे केल्यामुळे आम्हाला आढळून येते की टायबेरियस सीझर, पोंटियस पिलात, हेरोद, फिलिप, लायझानियास, हन्ना आणि कैफा हे सर्व लोकांचा परिचय जगिक रोमन आणि यहूदी इतिहासकारांद्वारे झाला आहे. वेगवेगळ्या राज्यकर्त्यांना दिलेल्या विविध पदव्या (उदा. पोंटियस पिलातासाठी ‘राज्यपाल’, हेरोदसाठी ‘टेट्रार्क’ ’इत्यादी) ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर आणि अचूक म्हणून सत्यापित केल्या गेल्या आहेत. यावरून हे वर्णन विश्वसनीयरित्या नमूद करण्यात आले होते हे आम्ही मूल्यांकन करू शकतो.

टायबेरियस सीझर सन 14 मध्ये रोमन सिंहासनावर आला. त्याच्या कारकिर्दीच्या 15 व्या वर्षाचा अर्थ असा आहे की योहानाने आपल्या कार्याची सुरुवात सन 29 मध्ये केली.

स्वामी योहानाचा संदेशपश्चात्ताप करा आणि आपली पापे कबूल करा

योहानाचा संदेश काय होता? त्याच्या जीवनशैलीप्रमाणेच, त्याचा संदेशही सोपा पण सामर्थ्यशाली होता. शुभवर्तमान  म्हणते :

दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान आला आणि यहूदीयाच्या वैराण प्रदेशात उपदेश करू लागला; तो म्हणाला,
2 “तुमची अंत:करणे व जीवने वाईटपणाकडून चांगुलपणामध्ये बदला कारण स्वर्गाचे राज्य जवळ येत आह्रे”

मत्तय 3:1-2

त्याचा संदेश प्रथम एखाद्या तथ्याची घोषणा होती – स्वर्गाचे राज्य ‘जवळ’ आले होते. परंतु लोक जोवर ‘पश्चात्ताप’ करीत नाहीत तोवर ते या राज्यासाठी तयार होणार नाहीत. खरे तर, त्यांनी ‘पश्चात्ताप’ न केल्यास ते राज्यास मुकतील. पश्चात्ताप म्हणजे “आपले मन बदलणे; पुनर्विचार करणे; वेगळा विचार करणे” एका अर्थाने ते प्रायस्चिता (प्रायश्चित) सारखे आहे. पण त्यांनी कशाबद्दल वेगळा विचार करावयाचा होता? योहानाच्या संदेशाला मिळालेले प्रतिसाद पाहून आपण पाहू शकतो. त्याच्या संदेशाला लोकांनी उत्तर दिले :

6 आपण केलेली पापे लोक त्याला सांगत होते आणि योहान त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मादेत

होता.मत्तय 3:6

आपली नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे आपली पापे लपवून ठेवणे आणि आपण चूक केली नसल्याचे ढोंग करणे. आपल्या पापांची कबुली देणे आणि पश्चात्ताप करणे आपल्यासाठी जवळजवळ अशक्य आहे कारण ते आपले अपराध आणि लज्जा प्रगट करते. योहानाने प्रचार केला की लोकांना स्वतःला देवाच्या राज्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी पश्चात्ताप (प्रायश्चित) करण्याची गरज आहे.

या पश्चात्तापाचे चिन्ह म्हणून त्यांना योहानाद्वारे नदीत बाप्तिस्मा घेणे अगत्याचे होते. बाप्तिस्मा म्हणजे पाण्याने धुणे किंवा विधियुक्त प्रक्षालन. त्यानंतर लोक स्वतःस शुद्ध ठेवण्यासाठी कप आणि भांडी यांचासुद्धा ‘बाप्तिस्मा’ (प्रक्षालन) करीत. पुजाऱ्याद्वारे अभिषेकासाठी व उत्सवासाठी मुर्तींस अभिषेकात (अभिषेक) विधीपूर्वक स्नान केले जाते हे आमच्या परिचयाचे आहे, इनाभिषेक मानवांना ‘देवाच्या प्रतिरूपात’ निर्माण करण्यात आले होते आणि म्हणून योहानाचे विधीवत नदीत स्नान करणे अभिषेकासारखे होते जे स्वर्गातील राज्यासाठी देवाच्या पश्चात्ताप करणाऱ्या प्रतिरूपास प्रतीकात्मकरित्या तयार करते. आज बाप्तिस्मा हा सामान्यतया ख्रिस्ती प्रथा मानला जातो, परंतु येथे त्याचा उपयोग देवाच्या राज्याच्या तयारीसाठी शुद्धीकरण सूचित करणारा व्यापक स्वरूपाचा असा होता.

प्रायश्चिताचे फळ

अनेक लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी योहानाकडे आले, परंतु सर्वांनी प्रामाणिकपणे त्यांच्या पापांचा स्वीकार केला नाही व कबुली दिली नाही. शुभवर्तमान म्हणते:

7 योहान जेथे लोकांना बाप्तिस्मा देत होता तेथे अनेक परूशीआणि सदूकीआले. जेव्हा योहानाने त्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो, सापाच्या पिल्लांनो, देवाचा जो राग ओढवणार आहे त्याच्यापासून दूर पळण्याचे तुम्हांला कोणी सुचविले?
8 म्हणून पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या.
9 अणि ‘अब्राहाम माझा पिता आहे.’ अशी फुशारकी तुम्हांला मारता येईल असे समजू नका; मी तुम्हांस सांगतो की, देव अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करू शकतो.
10 झाडे तोडण्यासाठी कुऱ्हाड तयार आहे. चांगले फळ न देणारे प्रत्येक झाड कापून अग्नीत टाकले जाई

ल.मत्तय 3:7-10

परूशी व सदूकी मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक होते, आणि नियमशास्त्राचे सर्व नियम पाळण्यासाठी फार प्रयत्न करीत असत. प्रत्येकाचा असा विचार होता की या पुढाऱ्यास, त्यांच्या धार्मिक शिक्षणामुळे आणि गुणवत्तेमुळेच देवाने मान्यता दिली. परंतु योहानाने त्यांना ‘सापाची पिल्ले’ म्हटले आणि त्यांच्या आगामी न्यायाबद्दल त्यांना चेतावणी दिली.

का?

‘पश्चात्तापास योग्य असे फळ न देण्याद्वारे’ हे सिद्ध झाले की त्यांनी खरोखर पश्चात्ताप केला नव्हता. त्यांनी त्यांच्या पापांची कबुली दिली नव्हती परंतु त्यांचे पाप लपविण्यासाठी ते त्यांच्या धार्मिक विधींचा वापर करीत होते. त्यांचा धार्मिक वारसा, जरी चांगला असला तरी, त्यांस पश्चात्तप्त करण्याऐवजी त्यांना अहंकारी बनवीत होता.

पश्चात्तापाचे फळ

पापांची कबुली आणि पश्चात्तापासोबत वेगळ्याप्रकारे जगण्याची अपेक्षा आली. लोकांनी या चर्चेत योहानाला त्यांचे पश्चात्ताप कसे दाखवावे हे विचारले :

10 जमावाने त्याला विचारले, “मग आता आम्ही काय करावे?”
11 त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन सदरे असतील त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला ते वाटून द्यावे. ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”
12 काही जकातदारही बाप्तिस्मा करुन घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”
13 तो त्यांना म्हणाला, “गरजेपेक्षा जास्त जमा करु नका.” हेच तुम्हांला सांगितले आहे.
14 काही शिपायांनीसुद्धा त्याला विचारले, “आणि आम्ही काय करावे?”योहान त्यांना म्हणाला, “कोणाकडून बळजबरीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करु नका. आणि तुम्हांला मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”

लूक 3:10-14

योहान ख्रिस्त होता का?

त्याच्या संदेशाच्या बळामुळे, अनेकांच्या मनात हा विचार होता की योहान हा मशीहा आहे काय, जो देवाचा अवतार म्हणून येईल असे प्राचीन काळापासून वचन देण्यात आले होते. शुभवर्तमानात ही चर्चा नमूद करण्यात आली आहे :

15 लोक मशीहाची अपेक्षा करीत होते. आणि ते सर्व त्यांच्या मनामध्ये योहानाबद्दल आश्चर्य करीत होते व असा विचार करीत होते की, “कदाचित तो ख्रिस्त असण्याची शक्यता आहे.”
16 त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले; तो म्हणाला. “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.
17 त्याचे खळे स्वच्छ करण्यासाठी व त्याच्या कोठारात गहू साठविण्यासाठी त्याच्या हातात त्याचे सूप आहे पण भुसा तो न विझविता येणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”
18 योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करुन सुवार्ता सांगित

ली.लूक 3:15-18

योहानाने त्यांना सांगितले की मशीहा (ख्रिस्त) लवकरच येत आहे, म्हणजे येशू.

स्वामी योहानाचे कार्य आणि आम्ही

देवाच्या राज्यासाठी लोकांना तयार करून योहानाने येशूबरोबर भागीदारी केली, कारण वाईटाविरुद्धच्या त्यांच्या माहिमेत बलराम कृष्णाबरोबर सहभागी झाला होता. योहानाने त्यांना आणखी नियम देऊन तयार केले नाही, उलट त्यांच्या आंतरिक पश्चातापाने त्यांना तयार केले होते हे दर्शविण्यासाठी त्याने त्यांच्या पापांबद्दल पश्चात्ताप करण्यासाठी (प्रायश्चित) करण्यासाठी आणि नदीत विधिवत स्नान (आत्माभिषेक) करण्यासाठी बोलाविले होते.

कठोर वैराग्याचे नियम पाळून असे करणे अधिक कठीण आहे कारण यामुळे आपली लज्जा व अपराधाचा पर्दाफाश होतो. तत्कालीन धार्मिक पुढारी पश्चात्ताप करू शकले नाहीत. त्याऐवजी त्यांनी त्यांची पापे लपविण्यासाठी धर्माचा वापर केला. या निवडीमुळे येशू आला तेव्हा देवाचे राज्य समजण्याची त्यांची तयारी नव्हती. योहानाची ताकीद आजही तितकीच प्रसंगोचित आहे. आम्ही पापापासून पश्चात्ताप करावा अशी त्याची मागणी आहे. आम्ही करू काय?

सैतानाद्वारे येशूची परीक्षा होते त्याद्वारे आपण त्याच्या व्यक्तित्वाचा शोध चालू ठेवू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *