Skip to content

देहामध्ये ओम – सामर्थी वचनाद्वारे दाखविलेला

  • by

ध्वनी हे पूर्णपणे भिन्न माध्यम आहे ज्याद्वारे पवित्र प्रतिमा किंवा ठिकाणांपेक्षा परम सत्यास (ब्राह्मण) समजले जाते. ध्वनि म्हणजे मुख्यत्वेकरून लहरींद्वारे प्रसारित केलेली माहिती आहे. ध्वनीद्वारे वाहून आणलेली माहिती सुंदर संगीत, निर्देशांचा संच, किंवा कोणी पाठवू इच्छित असलेला संदेश असू शकतो.

ओमचे प्रतीक. प्रणवमधील तीन भाग आणि क्रमांक 3 लक्षात घ्या.

जेव्हा कोणी आवाज किंवा ध्वनिद्वारे संदेश देतो, तेव्हा त्यात काहीतरी दैवीय असते, किंवा दैवीयचा एक भाग प्रतिबिंबित होतो.  प्रणव म्हणून उल्लेखिल्या जाणाऱ्या पवित्र ध्वनी आणि प्रतीक ओम (ऑम) द्वारे हे टिपले जाते. ओम (किंवा ऑम) एक पवित्र जप आणि त्रिकोणीय प्रतीक दोन्ही आहे. ओमचा अर्थ आणि गुणार्थ हे विविध परंपरेतील विचारसरणीनुसार भिन्न आहेत. प्राचीन हस्तलिखिते, मंदिरे, मठ आणि संपूर्ण भारतातील आत्मिक सम्मेलनांत त्रिकोणी प्रणव संकेत प्रचलित आहे. प्रणव मंत्र अंतिम सत्य (ब्राह्मण) अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी आहे. . ओम म्हणजे अकसरा किंवा एकक्षराच्या बरोबरीचे आहे  – एक अविनाशी वास्तविकता किंवा सत्य.

त्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण आहे की वेद पुस्तकांत (बायबल) सृष्टीची नोंद तीन भागी अभिकर्त्याच्या बोलण्याद्वारे होते. देव ‘बोलला’ (संस्कृत व्याहृति (व्याहृती)) आणि सर्व प्रकारच्या लहरींच्या माध्यमातून प्रसारित होणारी माहिती प्रसारित केली गेली .लोकामुळे आज व्याहृतीच्या जटिल विश्वामध्ये वस्तुमान आणि उर्जा यांची नियमबद्ध रचना घडून आली. हे घडले कारण ‘देवाचा आत्मा’ वस्तुमात्रावर तरंगत होता किंवा कंपन करीत होता. कंपन दोन्ही प्रकारची शक्ती आहे अर्थात उर्जा आणि ध्वनीचे सार देखील त्यात आहे. हिब्रू वेद वर्णन करतात की कशाप्रकारे तिहेरी : देव, देवाचा शब्द, आणि देवाचा आत्मा, यांनी त्याच्या उच्चाराची (व्याहृति) घोषणा केली, परिणामी आपण आता पाहत असलेले विश्व निर्माण झाले. येथे त्याची नोंद आहे.

हिब्रू वेद : त्रिएक उत्पन्नकर्ता उत्पत्ति करतो

वाने आकाश व पृथ्वी निर्माण केली.
2 सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती; पृथ्वीवर काहीही नव्हते. अंधाराने जलाशय झाकलेले होते; आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता
3 नंतर देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश चमकू लागला.
4 देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे. नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला.
5 देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधाराला “रात्र” अशी नावे दिली.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला पहिला दिवस.
6 नंतर देव बोलला, “जलांस दुभागण्याकरिता जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो.”
7 तेव्हा देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व खालच्या जलांस वेगळे केले.
8 देवाने अंतराळास “आकाश” असे नांव दिले.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला दुसरा दिवस.
9 नंतर देव बोलला, “अंतराळाखालील पाणी एकत्र गोळा होवो व कोरडी जमीन दिसून येवो.” आणि तसे घडले,
10 देवाने कोरड्या जमिनीस “भूमि” आणि एकत्र झालेल्या जलसंचयास “समुद्र” अशी नावे दिली. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
11 मग देव बोलला, “गवत, बीज देणाऱ्या वनस्पती आणि फळे देणाऱ्या वनस्पती पृथ्वीवर वाढोत. फळझाडे बिया असलेली फळे तयार करतील आणि प्रत्येक वनस्पती आपल्या जातीच्याच बिया तयार करील अशा वनस्पती पृथ्वीवर वाढोत.” आणि तसे झाले.
12 गवत, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळ झाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
13 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला तिसरा दिवस.
14 मग देव बोलला “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या विशेष चिन्हे, आणि विशेष मेळावे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत.
15 पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या ज्योति होवोत.” आणि तसे झाले.
16 देवाने दोन मोठ्या ज्योति निर्माण केल्या. दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योति सूर्य आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योति, चंद्र, आणि त्याने तारेही निर्माण केले.
17 देवाने त्या ज्योति पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आणि दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी आकाशात ठेवल्या. त्या ज्योतींनी प्रकाश व अंधार वेगळे केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
18
19 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला चौधा दिवस.
20 मग देव बोलला, “जलामध्ये जीवजंतूचे थवेच्या थवे उत्पन्न होवोत. आणि पृथ्वीवर आकाशात पक्षी उडोबागडोत” –
21 समुद्रातील प्रचंड जलचर म्हणजे पाण्यात फिरणारे व अनेक जातीचे व प्रकारचे जलप्राणी देवाने उत्पन्न केले. तसेच आकाशात उडणारे निरनिराळड्या जातीचे पक्षीही देवाने उत्पन्न केले आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
22 देवाने त्यांना आशीर्वाद दिला, “फलद्रूप व्हा, वाढा, समुद्रातील पाणी व्यापून व भरुन टाका आणि पक्षी बहुगुणित होवोत व पृथ्वी व्यापून टाकोत.”
23 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली हा होता पाचवा दिवस.
24 मग देव बोलला, “निरनिराळया जातीचे पशू, मोठे प्राणी वेगवेगळड्या जातीचे सरपटणारे व रांगणारे लहान प्राणी असे जीवधारी प्राणी पृथ्वीवर उत्पन्न होवोत. ते आपापल्या जातीचे अनेक प्राणी निर्माण करोत.” आणि तसे सर्व झाले.
25 असे देवाने वनपशू, पाळीव जनावरे, सरपटत जाणारे लहान प्राणी व वेगवेगळया जातीचे जीवधारी प्राणी निर्माण केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले

आहे.उत्पत्ति 1:1-25

त्यानंतर हिब्रू वेद सांगतात की देवाने मानवजातीला ‘देवाच्या प्रतिरूपात’ उत्पन्न केले जेणेकरून आपणास निर्माणकर्त्यास प्रतिबिंबित करता यावे. पण आपले प्रतिबिंब इतके मर्यादित आहे की आपण बोलण्याने निसर्गाला आज्ञा देऊ शकत नाही. पण येशूने हे केले. आम्ही पाहतो की शुभवर्तमानाची पुस्तके या घटना कशा नोंदवितात

येशू निसर्गाशी बोलतो

येशूला ‘शब्दाद्वारे’ शिकवण्याचा आणि रोग बरे करण्याचा अधिकार होता. शुभवर्तमानात हे लिहिले आहे की त्याने हे सामर्थ्य कसे दाखविले की त्याचे शिष्य ‘भीती व आश्चर्य’ यांनी भारावून गेले होते.

22 त्या दिवसात एकदा असे झाले की, येशू त्याच्या शिष्यांसह नावेत बसला. आणि तो त्यांना म्हणाला, “आपण सरोवराच्या पलीकडाच्या बाजूला जाऊ या.”
23 आणि ते निघाले. ते जात असता येशू झोपी गेला. सरोवरावर तुफान वादळी वारे सुरु झाले व नावेत पाणी जाऊ लागले. ते अतिधोकादायक स्थितीत सापडले.
24 म्हणून त्यांनी त्याला उठविले, ते त्याला म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण बुडत आहोत!”मग तो उठला. त्याने वारा व लाटा यांना दटाविले. ते थांबले. व सर्वत्र शांतता पसरली.
25 येशू त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास कोठे आहे?” पण ते भयचकित आणि विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण तो वारा आणि लाटा यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात?”

लूक 8:22-25

येशूच्या शब्दाने वारा आणि लाटा यांनासुद्धा आज्ञा केली! शिष्य भयभीत झाले यात आश्चर्यच नाही. दुसऱ्या प्रसंगी त्याने हजारों लोकांसमवेत असेच सामर्थ्य दाखविले. यावेळी त्याने वारा आणि लहरी यांना आज्ञा दिली नाही – तर अन्नास दिली.

तर येशू गालील (किंवा तिबिर्या) सरोवराच्या पलीकडे गेला.
2 तेव्हा पुष्कळ लोक येशूच्या मागे गेले. कारण येशूने अनेक आजारी लोकांना बरे केले. व निरनिराळ्या मार्गांनी आपले जे सामर्थ्य दाखविले ते लोकांनी पाहिले. म्हणून ते त्याच्यामागे गेले.
3 मग येशू टेकडीच्या वर चढून गेला. तो आपल्या शिष्यांसह तेथे बसला.
4 त्याच सुमारास यहूदी लाकांचा वल्हांडण सण जवळ आला होता.
5 येशूने नजर वर करुन पाहिले तो लाकांचा मोठा समुदाय आपणांकडे येताना त्याला दिसला. येशू फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांना पुरेशा भाकरी कोठून विकत आणाव्या बरे?”
6 (फिलिप्पची परीक्षा पाहण्यासाठी येशूने त्याला हा प्रश्न विचारला, कारण आपण काय करायचे याचा विचार येशूने अगोदरच करुन ठेवला होता.)
7 फिलिप्पने उत्तर दिले, “येथील प्रत्येकाला थोडी थोडी भाकर दिली तरी या सर्वांना पुरेशा भाकर विकत घेण्यासाठी आपणा सर्वांना महिनाभर काम करावे लागेल.”
8 आंद्रिया नावाचा दुसरा एक शिष्य तेथे होता. आंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ होता.
9 आंद्रिया म्हणाला, “येथे असलेल्या एका लहान मुलाजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत. परंतु इतक्या लोकांना त्या पुरणार नाहीत.”
10 येशू म्हणाला, “लोकांना खाली बसण्यास सांगा.” ती बरीच गवताळ अशी जागा होती. तेथे खाली बसलेले सुमारे पाच हजार पुरुष होते.
11 मग येशूने त्या भाकरी हातात घेतल्या; येशूने भाकरीबद्दल देवाचे उपकार मानले आणि त्या तेथे बसलेल्या लोकांना दिल्या. मासे घेऊन त्याने तसेच केले. येशूने लोकांना पाहिजे तितके खाऊ दिले.
12 सर्व लोकांना खाण्यासाठी भरपूर होते. जेवण झाल्यावर येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “लोकांनी खाऊन उरलेले भाकरींचे व माशांचे तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.”
13 म्हणून शिष्यांनी उरलेले तुकडे जमा केले. लोकांनी जेवायाला सुरुवात केली, तेव्हा जवाच्या फत्त पाच भाकरी तेथे होत्या. शिष्यांनी उरलेल्या तुकडचांच्या बारा टोपल्या भरल्या.
14 येशूने केलेला हा चमत्कार लोकांनी पाहिला, तेव्हा ते म्हणाले, “जगात येणारा संदेष्टा तो खरोखर हाच असला पाहिजे.”
15 आपण राजा बनावे असे लोकांला वाटते हे येशूला माहीत होते. येशूला आपला राजा करावे असा बेत लोकांनी केला. तेव्हा येशू तेथून निघून एकटाच डोंगराळ भागात

गेला.योहान 6:1-15

जेव्हा त्यांनी पाहिले की, येशू केवळ उपकार मानून अन्न वाढवू शकतो तेव्हा त्यांना कळून आले की तो अद्वितीय आहे. तो वागीशा (वागीशा, संस्कृतमध्ये वाणीचा प्रभु) होता. पण याचा अर्थ काय होता? नंतर येशूने आपल्या शब्दांचे सामर्थ्य किंवा प्राण स्पष्ट करून समजाविले.

 63 शरीराद्दरे मनुष्याला जीवन मिळत नाही. परंतु आत्म्याकडून ते जीवन मिळते. मी तुम्हांला सांगितलेल्या गोष्टी आत्म्याविषयी आहेत, म्हणूनच या गोष्टीपासून जीवन मिळते.

योहान 6:63

आणि

57 पित्याने मला पाठविले. तो जिवंत आहे आणि पित्यामुळे मीही जगतो. म्हणून जो कोणी मला खातो तो माझ्यामुळे जिवंत राहील.

योहान 6:57

येशू असा दावा करीत होता की त्याने देहात मूर्तिमंत सृष्टीच्या त्रिएक उत्पन्नकर्त्यास (पिता, शब्द, आत्मा) देहधारण केले होते ज्याने आपल्या बोलण्याद्वारे विश्वास अस्तित्वात आणले होते. तो मानवी रूपात जिवंत ओम होता. जिवंत देहातील तो पवित्र त्रि-भाग किंवा त्रिएक प्रतीक होता. त्याने वारा, लहरी आणि द्रव्य यावर आपले सामर्थ्य बोलून प्राण (प्राण) किंवा जीवन-शक्ती जिवंत प्रणव असल्याचे दाखवून दिले.

ते कसे असू शकते? याचा अर्थ काय?

समजण्यासाठी अंतःकरणे

येशूच्या शिष्यांना हे समजण्यास फार कठीण गेले. 5000 लोकांना खावयास दिल्यानंतर शुभवर्तमानात हे लगेच नोंदवले गेले आहे :

45 नंतर येशूने लगेच शिष्यांना नावेत बसविले आणि पलीकडे असलेल्या बेथसैदा येथे त्याच्यापुढे जाण्यास सांगतिले. तोपर्यंत त्याने लोकांना निरोप देऊन घरी पाठवले.
46 त्यांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला.
47 संध्याकाळ झाली तेव्हा नाव सरोवराच्या मध्यभागी होती आणि जमिनीवर येशू एकटाच होता.
48 मग त्याने त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे पाहिले. कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू नावेकडे गेला. येशू पाण्यावरून चालत होता व तो त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागला.
49 जेव्हा त्यांनी त्याला सरोवरावरून पाण्यावरून चालताना पाहिले तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले.
50 कारण त्या सर्वांनी त्याला पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भीऊ नका, मी आहे,”
51 नंतर तो त्यांच्याकडे नावेत गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले.
52 कारण त्यांना भाकरीच्या संदर्भातील चमत्कार समजलाच नव्हता आणि त्यांची मने कठीण झाली होती.
53 त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतच्या किनाऱ्याला आले व नाव (होड़ी) बांधून टाकली.
54 ते नावेतुन उतरले, तेव्हा लोकांनी येशूला ओळखले.
55 लोक हे सागण्यासाठी इतर सर्व लोकांकडे पळाले आणि आजाऱ्यांना खाटेवर घालून जेथे तो आहे असे ऐकले तेथे घेऊन जाऊ लागले.
56 खेड्यात, गावात किंवा शेतात आणि, जेथे बाजाराच्या जागी कोठे तो गेला तेथे लोकांनी आपल्या आजारी माणसांना आणून ठेवले. त्यांनी त्याला फक्त त्याच्या झग्याच्या काठाला स्पर्श करू देण्याची विनंति केली. ज्यांनी त्याला स्वर्श केला ते बरे

झाले.मार्क 6:45-56

असे म्हटले आहे की शिष्यांना ‘उमगले नव्हते’. न समजण्याचे कारण ते बुद्धिमान नव्हते असे नाही; याचे कारण त्यांनी काय घडले ते पाहिले नाही हे नव्हते; कारण ते वाईट शिष्य होते असे नाही; त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही यामुळे देखील ते नव्हते. असे म्हटले आहे की त्यांचेअंतःकरण कठीण झाले. आपल्या स्वतःच्या कठोर अंतःकरणामुळे आपल्याला आत्मिक सत्य समजणे कठीण जाते.

त्याच्या काळातल्या लोकांत येशूविषयी इतके मतभेद होते याचे हे मूलभूत कारण आहे. वैदिक परंपरेनुसार आपण असे म्हणू शकतो की तो प्रणव किंवा ओम असल्याचा दावा करीत होता, अक्षर ज्याने आपल्या बोलण्याने जग अस्तित्वात आणले, आणि नंतर मनुष्य – क्सर अर्थात क्षर म्हणजे नाशमान बनला. बौद्धिकदृष्ट्या समजून घेण्यापेक्षा आपल्या अंतःकरणातून हट्टीपणा दूर करण्याची गरज आहे.

म्हणूनच योहानाचे तयारीचे काम महत्त्वपूर्ण होते. त्याने लोकांस पाप लपविण्याऐवजी त्यांच्या पापांची कबुली देऊन पश्चात्ताप करण्यास सांगितले. जर येशूच्या शिष्यांची अंतःकरणे कठोर होती ज्यासाठी पश्चात्ताप करण्याची आणि पापांची कबुली देण्याची गरज होती, तर आपण आणि मी असे करणे किती जरूरी आहे!

काय करावे?

अतःकरण नम्र करण्यासाठी समज प्राप्त करण्यासाठी मंत्र

मला ही हिब्रू वेदांमध्ये मंत्र म्हणून दिलेली कबुली देणारी प्रार्थना करणे सहायक असल्याचे आढळले आहे. कदाचित हे ध्यान करणे किंवा जप करणे तसेच ओम आपल्या अंतःकरणातही कार्य करील.

वा, माझ्यावर दया कर, तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक.
2 देव माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक. माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.
3 मी पाप केले हे मला माहीत आहे. ती पापे मला नेहमी दिसतात.
4 तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे सांगतोस त्याच मी केल्या. देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले. मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास. तुझे निर्णय योग्य आहेत.
5 मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.
6 देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.
7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर. मला आंघोळ घाल म्हणजे मी बफर्पोक्षा शुभ्र होईन.
8 मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग. तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस, ती पुसून टाक.
10 देवा माझ्यात पवित्र ह्दय निर्माण कर. माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.
11 मला दूर लोटू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो, मला पुन्हा तुझा आनंद दे, माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा

कर.स्तोत्र 51:1-4,10-12

जिवंत शब्द म्हणून, येशू हा देवाचा “ओम” आहे याचा अर्थ काय आहे, हे समजण्यासाठी आम्हाला या पश्चात्तापाची गरज आहे.

तो का आला? आपण पुढे पाहू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *