Skip to content

जिवंत पाणी: गंगा येथील तीर्थाच्या भिंगामधून

  • by

जर एखाद्यास परमेश्वरास भेटण्याची आशा असेल तर प्रभावी तीर्थ आवश्यक आहे. तीर्थ (संस्कृत तीर्थ) म्हणजे “ओलांडण्याचे स्थान, घाट” आणि पवित्र स्थान असलेल्या कोणत्याही स्थानाचा, मजकूराचा किंवा व्यक्तीचा उल्लेख करते. तीर्थ हा एकमेकांस स्पर्ष करणार्या जगातील एक पवित्र जंक्शन आहे. वैदिक ग्रंथांमध्ये, तीर्थ (किंवा क्षेत्र, गोपीठा आणि महालय) एखाद्या पवित्र व्यक्तीचा, किंवा पवित्र ग्रंथाचा उल्लेख करते, ज्यामुळे अस्तित्वाच्या एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत संक्रमण होऊ शकते.

तीर्थयात्रा म्हणजे तीर्थाशी संबंधित प्रवास

आपल्या अंतःकरणात चैतन्य आणण्यासाठी आणि शुद्ध करण्यासाठी आपण तीर्थयात्रेस जातो, आणि प्रवासामध्ये आत्मिक गुणवत्ता आहे, हा असा विषय आहे ज्याविषयी आणि वैदिक ग्रंथात ठामपणे सांगितले ते ठामपणे सांगतात की तीर्थयात्रा पापांपासून सुटका देऊ शकते. तीर्थयात्रा अंतर्गत ध्यान प्रवासापासून ते प्रख्यात मंदिरांपर्यंत शारीरिकदृष्ट्या प्रवास करणे किंवा सर्वात महत्वाचे तीर्थस्थळ, म्हणजे गंगेसारख्या नद्यांमध्ये स्नान करणे असू शकते. पाणी हे भारतीय परंपरेतील सर्वात पवित्र प्रतीक आहे, विशेषतः गंगेचे पाणी. गंगा नदीची देवी गंगा माता म्हणून पूजली जाते.

तीर्थ म्हणून गंगेचे पाणी

गंगा संपूर्ण लांबीसह पवित्र आहे. गंगा देवीच्या शक्तीतील दैनंदिन विधी, पुराणकथन, उपासनापद्धती आणि आणि तिचे जिवंत पाणी यावर विश्वास आजही भक्तीचे केंद्रबिंदू आहेत. अनेक मृत्यूविधींमध्ये गंगेचे पाणी आवश्यक असते. गंगा अशा प्रकारे जिवंत आणि मृत यांच्यात तीर्थ आहे. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तीन जगांत गंगेचे प्रवाह असल्याचे म्हटले जाते, जिचा उल्लेख ज्याला त्रिलोक-पथ-गमिनी असे म्हणतात. अशाप्रकारे ती गंगेच्या त्रिशली (“तीन ठिकाणी”) येथे आहे जेथे सामान्यतः श्राद्ध  आणि विसर्जन केले जाते. अनेकांची इच्छा असते की त्यांची राख गंगा नदीत घालावी.

This image has an empty alt attribute; its file name is ganges-among-the-mountains.jpg

पर्वतामधील गंगा नदी

गंगेची पौराणिक कथा

असे म्हटले जाते की शिव, गंगाधर किंवा ”गंगेचा वाहक“ गंगेचा सोबती आहे. वैदिक ग्रंथांमध्ये गंगेच्या खाली येण्यात शिवाची भूमिका असल्याचे सांगितले आहे. जेव्हा गंगा पृथ्वीवर आली, तेव्हा शिवाने तिला आपल्या डोक्यावर धारण करण्याचे वचन दिले जेणेकरून तिच्या पडण्याने पृथ्वीचा नाश होणार नाही. जेव्हा गंगा शिवाच्या डोक्यावर पडली, तेव्हा शिवाच्या केसांनी तिची गळती तोडली आणि गंगेला सात प्रवाहात मोडले, प्रत्येक भारताच्या वेगवेगळ्या भागात वाहते. म्हणूनच, जर कोणी गंगा नदीची यात्रा करू शकले नाहीत, तर या इतर पवित्र प्रवाहांची यात्रा करू शकतात: यंगुना, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी.

गंगेचे पृथ्वीवर उतरणे सतत मानले जाते, पृथ्वीला स्पर्श करण्यापूर्वी गंगेची प्रत्येक लाट शिवाच्या डोक्याला स्पर्श करते. गंगा हा शिवाच्या शक्तीचे किंवा उर्जेचे द्रव रूप आहे. एक द्रव शक्ती असल्याने, गंगा हा भगवंताचा अवतार आहे, ईश्वराचे दिव्य अवतरण, सर्वांसाठी मुक्तपणे वाहणे. तिच्या पृथ्वीवर उतरल्यानंतर, गंगा शिवाचे वाहन बनली, आपल्या हातात कुंभ (विपुलतेचे पुष्पपात्र) धरून ती आपले वाहन (वाहन) मगर यावर (मकर) विराजलेली असल्याचे चित्रण केले गेले आहे.

गंगा दशहरा

दरवर्षी पुराणकथा साजरे करण्यासाठी गंगा दशहरा हा सण गंगेला समर्पित केला जातो. हा उत्सव मे आणि जून महिन्यात दहा दिवस चालतो, आणि ज्येष्ठ महिन्याच्या दहाव्या दिवशी समाप्त होतो. या दिवशी, स्वर्गातून पृथ्वीपर्यंत गंगेच्या उतरण्याचा (अवतरण) उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी गंगेच्या पाण्यात किंवा इतर पवित्र प्रवाहांत त्वरित डुबकी घेतल्यास दहा पाप (दशहरा) किंवा पापांच्या दहा जीवनकाळांपासून मुक्ती मिळते.

येशू: तीर्थ तुम्हाला जिवंत पाणी देऊ इच्छितो

स्वतःचे वर्णन करण्यासाठी येशूने यासारख्याच संकल्पनांचा उपयोग केला. त्याने घोषित केले की तोजिवंत पाणीआहे जोसार्वकालिक जीवनदेतो. हे त्याने पापात अडकलेल्या एका स्त्रीला म्हटले आणि अशाच परिस्थितीत असलेल्या आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. वस्तुतः, तो म्हणत होता की तो एक तीर्थ आहे आणि आपण करू शकतो अशी सर्वात महत्वाची तीर्थयात्रा त्याच्याकडे येणे आहे. या स्त्रीला असे आढळले की फक्त दहाच नव्हेत तर, तिची सर्व पापे एकदाची शुद्ध झाली आहेत. आपण शुद्धीकरण शक्तीसाठी गंगाजल मिळविण्यासाठी आपण दूरवर प्रवास करत असाल, तर येशू देऊ करीत असलेलेजिवंत पाणीसमजून घ्या. या पाण्यासाठी तुम्हाला शारीरिक प्रवास करावा लागणार नाही, परंतु स्त्रीला दिसून आल्याप्रमाणे, त्याचे पाणी तुम्हाला शुद्ध करण्यापूर्वी, तुम्हाला आंतरिक सुधातेमध्ये आत्मसाक्षात्काराचा प्रवास करावा लागेल.

शुभवर्तमानात या भेटीची नोंद आहे :

येशू एका शोमरोनी स्त्रीशी बोलतो

रुश्यांनी हे ऐकले की, येशू योहानापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन शिष्य करुन घेत आहे.
2 (परंतु खरे पहता, येशू स्वत: बाप्तिस्मा देत नसे, तर न्याचे शिष्य त्याच्या वतीने लोकांना बाप्तिस्मा देत असत.) परुश्यांनी आपणांविषयी ऐकले आहे हे येशूला समजले.
3 म्हणून येशू यहूदीयातून निघून परत गालील प्रांतात गेला.
4 गालीलाकडे जाताना येशूला शोमरोन प्रांतातून जोवे लागले.
5 शोमरोनातील सूखार नावाच्या गावात येशू आला. याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ हे गाव आहे.
6 याकोबाची विहीर तेथे होती. लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता. म्हणून येशू विहीरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती.
7 तव्हा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनीस्त्री त्या विहीरीवर आली. येशू तिला म्हणाला. “मला प्यावयास पाणी दे.’
8 हे घडले तेव्हा येशूचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेले होते.
9 ती शोमरोनी स्त्री म्हणाली, “तुम्ही यहूदी आहात आणि मी तर एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावयास मागता याचे मला मोठे आश्चर्य वाटते.” (यहूदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोख्याचे संबंध नव्हते.)
10 येशूने उत्तर दिले, “देव काय दान देतो याविषयी तुला माहीत नाही आणि तुझ्या हातून पाणि मागणारा कोण हे देखील तुला माहीत नाही. तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस. आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते.”
11 ती म्हणाली, “महाराज, जिवंत पाणी तुम्हांला कोठून मिळणार? विहीर तर फार खोल आहे. आणि पाणी काढण्यासाठी तुमच्याजवळ पोहरा वगैरे काही नाही.
12 आमचा पिता (पूर्वज) याकोब याच्यापेक्षाही तुम्ही मोठे आहात काय? याकोबानेच ही विहीर आम्हांला दिली. ते स्वत: या विहीरीचे पाणी पीत असत, शिवाय त्यांची मुले व गुरेढोरे याच विहीरीचे पाणी पीत असत.”
13 येशू म्हणाला, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल.
14 परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.”
15 ती स्त्री येशूला म्हणाली, महाराज, “ते पाणी मला द्या, म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही. आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही.”
16 येशूने तिला सांगितले. “जा, तुझ्या पतीला घेऊन इकडे ये!”
17 ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” येशू तिला म्हणाला, “हे तू बरोबर सांगिलेस की, तुला नवरा नाही.
18 खरे तर तुझे पाच पती झाले, आणि आता तू ज्याच्याबरोबर राहतेस तो तुझा पती नाही. तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस.”
19 ती स्त्री म्हणाली, “महाराज, मला आता कळले की, तुम्ही एक संदेष्टा आहात.
20 आमचे वाडवडील या डोंगरावर उपासना करीत. परंतु तुम्ही यहूदी लोक म्हणता की, यरुशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहीजे.”
21 येशू म्हणाला, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव! अशी वेळ येत आहे की, आपल्या पित्याची (देवाची) उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही.
22 जे तुम्हांला समजत नाही त्याची तुम्ही शोमरोनी उपासना करता. आम्ही यहूदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हांला चांगले कळते, कारण यहूदी लोकांकडूनच तारण येते.
23 असा काळ येत आहे की, खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपालना करतील. तशी वेळ आता आलेली आहे. आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत.
24 देव आत्मा आहे. म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे.”
25 ती स्त्री म्हणाली, “मशीहा येणार आहे हे मला माहीत आहे. मशीहा येईल तेव्हा तो आम्हांला प्रत्थेक गोष्ट समाजावून सांगेल.”
26 .येशू म्हणाला, “ती व्यक्ति तुझ्याशी आता बोलत आहे. मीच तो मशीहा आहे.”
27 तेवढ्यात येशूचे शिष्य गावातून परत आले. येशू एका बाईशी बोलत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु “तुम्हांला काय पाहिजे?” अगर “तुम्ही तिच्याशी का बोलत आहात?” असे त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही.
28 मग ती स्त्री आपली पाण्याची घागर तशीच विहिरीवर सोडून परत गावात गेली. तिने गावांतील लोकांना सांगितले,
29 एका मनुष्याने मी आतापर्थेत जे काही केलेले आहे ते सर्व सांगितले. त्याला भेटायला चला. कदाचित तो ख्रिस्त असेल.
30 मग लोक गावातून बाहेर पडले आणि येशूला भेटायला आले.
31 ती स्त्री गावात होती तेव्हा येशूचे शिष्य त्याला विनवणी करु लागले, “गुरुजी, दोन घास खाऊन घ्या!”
32 परंतु येशूने उत्तर दिले. “माझ्याजवळ खावयाला जे अन्न आहे त्याविषयी तुम्हांला काहीच माहिती नाही.”
33 म्हणून शिष्य एकमेकांना विचारु लागले, “येशूला कोणीतरी अगोदरच काही खावयास आणून दिले काय?”
34 येशू म्हणाला, “ज्याने मला पाठवीले त्याच्या ईच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न! त्याने मला दिलेले काम पूर्ण करणे हेच माझे अन्न होय.
35 जेव्हा तुम्ही पेरणी करता तेव्हा तुम्ही नेहमी म्हणता, ‘पीक गोळा करायला अजून चार महिने आहेत.’ परंतु मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमचे डोळे उघडा. लोकांकडे पाहा. पीक तयार असलेल्या शेतांसारखेच ते आहेत.
36 आताही पीक कापणाऱ्या मजुराला मजुरी दिली जात आहे, तो अनंतकाळासाठी पीक गोळा करीत आहे. म्हणून आता पेरणी करणारा कापणी करणारासह आनंदी आहे.
37 ‘एक पेरणी करतो तर दुसरा कापणी’ असे जे आपण म्हणतो ते किती खरे आहे.
38 ज्या पीकासाठी तुम्ही मेहनत केली नाही, त्याची कापणी करण्यासाठी मी तुम्हांस पाठविले. दुसऱ्या लोकांनी काम केले आणि त्यांनी केलेल्या श्रमाचा फायदा तुम्हांस मिळतो.”
39 त्या गावातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. त्या स्त्रीने येशूविषयी जे सांगितले त्यावरुन त्यांनी विश्वास ठेवला. तिने त्यांना सांगितले होते, “मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली.”
40 शोमरोनी लोक येशूकडे आले. त्यांनी येशूला त्यांच्याबरोबर राहण्याची विनंती केली. म्हणून येशू तेथे दोने दिवास राहिला.
41 आणखी पुष्कळ लोकांनी येशूच्या शिक्षणामुळे विश्वास ठेवला.
42 ते लोक त्या स्त्रीला म्हणाले, “पहिल्यांदा तू जे आम्हांला सांगितलेस त्यामुळे आम्ही येशूवर विश्वास ठेवला. परंतु आता आम्ही स्वत:च त्याचे बोलणे ऐकले त्यामुळे विश्वास ठेवतो. आता आम्हांला कळले की, खरोखर हाच मनुष्य जगाचे तारण करील.”

योहान 4:1-42

येशूने दोन कारणास्तव पाणी मागितले. प्रथम, त्याला तहान लागली होती. पण त्याला (ऋषी असल्यामुळे) माहीत होते की ती देखील पूर्णपणे वेगळ्याप्रकारे तहानलेली होती. तिला आयुष्यात समाधानाची तहान लागली होती. तिला वाटले की पुरुषांशी अवैध संबंध ठेवून ही तहान भागू शकेल. त्यामुळे तिचे अनेक पती झाले होते आणि येशूबरोबर बोलत असताना ती तिचा नवरा नसलेल्या माणसाबरोबर राहत होती. तिचे शेजारी तिला अनैतिक म्हणून पाहत. सकाळीच्या शीतलवेळी विहिरीजवळ जाताना गावातील इतर स्त्रियांना ती सोबत नको असल्यामुळे कदाचित दुपारच्या वेळी ती पाणी घेण्यासाठी एकटीच गेली होती. या बाईचा अनेक पुरुषांषी संबंध आला होता आणि याने तिला गावातील इतर स्त्रियांपासून दूर केले.

येशूने तहानेचा विषय वापरला ज्यामुळे तिला हे समजले की तिच्या पापाचे मूळ तिच्या आयुष्यातील एक गंभीर तहान आहे – एक तहान, ज्याला विझविणे आवश्यक आहे. तो तिला (आणि आम्हाला) असे जाहीर करीत होता की केवळ तोच आमच्या अंतःकरणाची तहान भागवू शकतो जी सहज आपल्यास पापात पाडते.

विश्वास ठेवणे – सत्यात कबूल करणे

पण या ‘जिवंत पाण्याच्या’ देऊ करण्याने स्त्रीला पेचात पाडले. जेव्हा येशूने तिला आपल्या पतीस घेऊन येण्यास सांगितले तेव्हा तो तिला हेतूपुरस्सर तिचे पाप ओळखण्यास आणि कबूल करण्यास – त्याचा स्वीकार करण्यास प्रेरित करीत होता. आम्ही हे सर्वस्वी टाळतो! कुणालाही दिसणार नाहीत, या आशेने आम्ही आपली पापे लपविणे पसंत करतो. किंवा आपण आपल्या पापाचे निमित्त सांगत, तर्कवितर्क करतो. परंतु जर आपल्याला ‘‘सार्वकालिक जीवन’ देणारी देवाची वास्तविकता अनुभवण्याची इच्छा असेल तर आपण प्रामाणिक असले पाहिजे आणि आपले पाप कबूल केले पाहिजे, कारण शुभवर्तमानात असे अभिवचन दिले आहे :

8 जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वत:ला फसवीत आहोत. आणिआमच्यामध्ये सत्य नाही.

9 जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देवविश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो.

1 योहान 1:8-9

या कारणास्तव, जेव्हा येशू शोमरोनी स्त्रीला म्हणाला की

24 देव आत्मा आहे. म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे.”

योहान 4:24

त्याच्या म्हणण्याचा अर्थ ‘सत्य’ म्हणजे स्वतःबद्दल सत्य असणे, आपली चूक लपविण्याचा किंवा सबब सांगण्याचा प्रयत्न न करणे. अद्भुत बातमी अशी आहे की देव ‘शोधतो’ आणि अशा प्रामाणिकपणाने आलेल्या उपासकांना तो परत फिरवित नाही – मग ते कितीही अपवित्र झाले का असेनात.

पण आपले पाप कबूल करणे तिला खूप अवघड होते. लपविण्याचा सोयीस्कर मार्ग हा आहे की आपल्या पापापासून धार्मिक वादाकडे तो विषय बदलणे. जगात नेहमीच अनेक धार्मिक वाद आहेत. त्या दिवसांत शोमरोनी लोक आणि यहूदी यांच्यात योग्य उपासना स्थळाविषयी धार्मिक वाद होता. यहूदी लोक असे सांगत की यरुशलेमेमध्ये उपासना केली पाहिजे आणि शोमरोनी लोक असे मानत की उपासना दुसऱ्या डोंगरावर केली जावी. या धार्मिक वादाकडे वळून ती आपल्या संभाषणाचा विषय तिच्या पापापासून दूर नेण्याची अपेक्षा करीत होती. आता ती आपल्या धर्मामागे आपले पाप लपवू शकत होती.

किती सहज आणि स्वाभाविकरित्या आम्ही देखील असे करतो – विशेषेकरून जर आपण धार्मिक असलो तर. मग आपण इतर लोक कसे चुकीच्या मार्गावर आहेत किंवा आपले कसे बरोबर आहोत याचा निर्णय घेऊ शकतो – सोबतच आपल्या पापाची कबुली देण्याच्या आपल्या गरजेकडे दुर्लक्ष करतो.

येशूने तिच्याशी हा वाद घातला नाही. त्याने हे आवर्जून सांगितले ते उपासना स्थळ नाही, परंतु उपासनेत स्वतःविषयी तिची प्रामाणिकता महत्त्वाची होती. ती परमेश्वराच्या सान्निध्यात कोठेही येऊ शकत असे (कारण तो आत्मा आहे), परंतु हे ‘जिवंत पाणी’ मिळण्यापूर्वी तिला प्रामाणिक आत्म-साक्षात्कार आवश्यक होता.

आपण सर्वांनी घेतला पाहिजे असा निर्णय

म्हणून तिला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. ती एखाद्या धार्मिक वादाच्या मागे लपून राहू शकत होती किंवा कदाचित त्याला सोडून जाऊ शकत होती. पण शेवटी तिने तिचे पाप कबूल करण्याची – स्वीकार करण्याची – निवड केली इतके की इतरांना हे सांगण्यासाठी ती परत गावी गेली की कसे या ऋषीने तिला कसे ओळखले आणि तिने काय केले ते त्याला माहीत होते. ते तिने आता लपवून ठेवले नाही. असे करीत असतांना ती ‘विश्वासणारी’ झाली. यापूर्वी तिने पूजा आणि धार्मिक विधी पूर्ण केले होते, परंतु आता ती – आणि तिच्या गावातले – ‘विश्वासणारे’ झाले.

आस्तिक होणे म्हणजे मानसिकरित्या फक्त योग्य शिक्षणाशी सहमत होणे नाही – जरी हे महत्वाचे असले तरीही. याचा संबंध हा .विश्वास ठेवण्याशी आहे की दया करण्याच्या त्याच्या अभिवचनावर  ठेवला जाऊ शकतो, आणि म्हणून आपण यापुढे पाप लपवू नये. बऱ्याच काळापूर्वी अब्राहामाने आमच्यासाठी हा आदर्श मांडला होता – त्याने एका अभिवचनावर विश्वास ठेवला होता.

आपण सबब सांगता किंवा आपले पाप लपविता काय? आपण हे भक्तिपूर्ण धार्मिक प्रथेने किंवा धार्मिक वादाने लपवून ठेवता का? किंवा आपण आपले पाप कबूल करता का? आपल्या निर्माणकर्त्यासमोर येऊन दोषभावना उत्पन्न करणाऱ्या आणि लज्जास्पद पापांची प्रामाणिकपणे कबुली का देत नाही? मग आनंद करा की तो तुमच्या उपासनेचा ‘शोध घेतो’ आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या अनीतीपासून ’शुद्ध करेल’.

प्रामाणिकपणे आपली गरज ओळखून घेतल्यामुळे ती ‘मशीहा’ ख्रिस्ताला म्हणून समजू शकली आणि येशू तेथे दोन दिवस राहिल्यानंतर ते त्याला ‘जगाचा तारणारा’ म्हणून  समजू शकले. कदाचित आम्हाला अद्याप हे पूर्णपणे समजले नाही. परंतु त्यांचे पाप व त्यांची गरज कबूल करण्याद्वारे हे समजण्यासाठी स्वामी योहानाने लोकांना तयार केले होते, आपण कसे हरवलेल्या दशेत आहोत हे ओळखण्यासाठी व त्याच्याकडून मिळणारे जिवंत पाणी पिण्यासाठी हे आपणास तयार करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *